कोकण विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सागरी महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार.

कोकण विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला ५२३ कि.मी. लांबीचा रेवस ते रेड्डी हा चार पदरी सागरी महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मंत्री दादा भुसे यांनी दिले.भुसे म्हणाले, हा महामार्ग ३० वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे. काही ठिकाणी तो साडेचार मीटर आहे. तर काही ठिकाणी तो ७ मीटर आहे. आता तो चोर मार्गिकाचा राहणार आहे. हा रस्ता आता पूर्णतः नवीन होणार आहे. त्यामुळे त्याच्या खर्चात वाढ झाली आहे असे म्हणणे योग्य नाही.

५२३ किलोमीटर असलेल्या या रस्त्यासाठी २६,४६३ कोटी रुपये खर्च येणार आहे.हा रस्ता दोन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ९ पूल प्रस्तावित असून त्यासाठी ९,१०५ कोटी रुपये खर्च येणार आहे. रेवस, करंजा, रेवदंडा, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड, काळबादेवी, कुणकेश्‍वर या ९ ठिकाणी हे पुल होणार आहेत. या ९ पुलांपैकी पाच पुलांची वर्कऑर्डर काढली आहे. दोन पुलांचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. दाभोळ आणि काळबादेवी पुलासंदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत, त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button