वरिष्ठ अधिकारी शंभर शाळांना भेट देणार, शालेय शिक्षण विभागाचा कार्यक्रम.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेप्रमाणे १०० शाळांना भेटी देण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाने प्रस्तावित केला आहे यामध्ये शासकीय यंत्रणेतील उच्च पदस्थांसोबतच वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिका-यांना सोबत घेऊन हा उपक्रम करण्याचे निर्देश जारी झाले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रधानसचिव आदींनी २००५-२६ वा शैक्षणिक वर्षाची सुरूवात होण्याच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा नजिकच्या किसान शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे आहे.जिल्हाधिकार्‍यांनी कार्यक्रम तयार करून पालक सचिवांना कळवायचे आहे.

या भेटीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता व सोयी-सुविधा यांचा आढावा घेण्यात येणार आहे.शाळेला भेट देणारे लोकप्रतिनिधी तसेच अधिका-यांनी या उपक्रमाबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य याच्याशी चर्चा करावयाची आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी कल कसा वाढेल याबाबत उपाययोजना सुचवणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button