
खाडीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय प्रौढाचा खाडीच्या पात्रात बुडून मृत्यू
. रात्रीच्या सुमारास मुचकुंदी नदीच्या खाडी पात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या हर्चे पनोरेची वरचीवाडी येथील ६२ वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे .हर्चे – पनोरेची वरचीवाडी येथील शांताराम गणपत नरसळे ( वय – ६२ ) हे शेती व मासेमारीचा व्यवसाय करीत असतात. ते शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा . दरम्याने मासे पकडण्यासाठीनेहमी प्रमाणे मुचकुंदी नदी – खाडीच्या पात्रांमध्ये गेले होते . मात्र बराच उशीर झाल्याने ते घरी न आल्याने त्यांची पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी मुचकुंदी नदी – खाडी पात्रामध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी गेले असता त्यांना किनाऱ्यावर शांताराम नरसळे यांच्या चप्पल दिसून आल्या. मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत .
दरम्याने शांताराम यांचा मुलगा प्रतिक हा मुंबई – नालासोपारा येथे रहात असल्याने त्याचा चुलत भाऊ प्रशांत यांने त्याला फोन करून वडील मासे मारण्यासाठी गेले होते . त्याचा शोध घेत असताना ते कुठेच आढळून आलेले नाहीत,अशी माहिती दिली.तर रात्रभर शोध घेवून देखील शांताराम नरसळे हेआढळूण न आल्याने रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. तरी देखील त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.सायंकाळी ३.३० वा . शेळवी येथील मुचकुंदी नदी – खाडी पात्रांमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.