
बिबट्यासह अनेक जंगली श्वापदांनी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे मोर्चा वळविला
बिबट्यासह अनेक जंगली श्वापदांनी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे मोर्चा वळविल्याने तालुकावासियांच्या चिंतेत भर पडलेली असताना, वनविभाग या विषयात लक्ष घालीत नसल्याचे चित्र आहे. टाकडे, धुत्रोलीतील ग्रामस्थांनी गावांचे हद्दीत मोकळ्या रानात आम्हाला रानगवे दिसलेले असल्याची तक्रार केल्यानंतर पाळीव प्राण्यांप्रमाणेच तालुक्यातील वनजीवांचीही गणतीही करण्याची मागणी येथील पर्यावरण प्रेमींमधून केली जात आहे. तालुक्यात यापूर्वी कधीही न दिसलेला रानगव्यासारखा प्राणी व बिबट्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता वनविभागाने या जीवांचे रक्षण करण्याचे उद्देशाने अधिक सक्रीयपणे काम करण्याची आवश्यकता आहे. www.konkantoday.com