
कमळ चिन्हावरच लढायचा निर्धार- बाळ माने.
तीन निवडणुकांत झालेला पराभव आणि २०१९ मध्ये घडलेल्या घटना आपण विसरलो नाहीये, ही सत्वपरीक्षा आहे. रत्नागिरीकरांनी कोणाला हरवायचं आहे हे ठरवलेलं आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात भाजपला एकही जागा लढवण्यासाठी मिळाली नाही; मात्र आता कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवायची आहे, अशी सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे, असे प्रतिपादन भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळ माने यांनी केले.स्वयंवर मंगल कार्यालयात रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेतील भाजपच्या ३५० बूथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बूथ कमिट्या पूर्ण करून कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधावा. वरिष्ठ नेते निर्णय घेतील; परंतु आपण सज्ज राहिले पाहिजे