
मतदारसंघात एकही विकास काम शिल्लक राहणार नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन.
भैय्याकडून जनतेला विकासात्मक अपेक्षा असून त्या पूर्ण करण्यासाठी राज्याचा मंत्री म्हणून आणि त्यांचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्यासोबत आहे. तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीही भैय्यांसोबत आहेत. त्यामुळे राजापूर-लांजा मतदारसंघातील एकही विकासाचे काम शिल्लक राहार नाही, याची हमी मी या ठिकाणी देतो, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे बोलताना केले.
शहरातील आग्रे हॉल येथे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा लांजा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी किरण सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्वसामान्य नागरिकांची गर्दी झाली होती.www.konkantoday.com