काेकणामध्ये ’केरा केरलम’ जातीचे नारळ वाण बहरणार…

काेकणात ’केरा केरलम’ हे नारळाचे वाण अधिक उत्पादन देत प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्र भाटधे यांच्या प्रयाेगाच्या निष्कर्षाअंती आढळून आले आहे. या नारळाची वैशिष्ट्ये प्रति माड प्रतिवर्ष 118 फळांचे सरासरी उत्पादन असून खाेबरे प्रतिनारळ 170 ग्रॅम आहे. तर तेलाचे प्रमाण 69 टक्के इतके असल्याने त्याच्या उत्पन्नात सातत्य दिसून आले आहे. त्यामुळे ’केरा केरलम’ या नारळ लागवडीला प्राेत्साहन दिले जाणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे झालेल्या 53 व्या संयुक्त कृषी संशाेधन आणि विकास समितीमध्ये या वाणाच्या नारळ लागवडीस शिारस करण्यात आली आहे. हे वाण शिारसीत करण्याच्या संशाेधन कार्यात डाॅ. दिलीप नागवेकर, डाॅ राजन खांडेकर, डाॅ. वैभव शिदे, डाॅ. किरण मालशे, डाॅ. सुनील घवाळे, डाॅ. संताेष वानखेडे आणि डाॅ. पराग हळदणकर यांचे माेलाचे याेगदान लाभले आहे. नारळाला ’कल्पवृक्ष’ म्हणून ओळखले जाते. हे पीक जगभरातील 90 हून अधिक देशांमध्ये घेतले जाते. भारत हा जगातील एक प्रमुख नारळ उत्पादक देश आहे. एकूण जागतिक उत्पादनाच्या 31 टक्के उत्पादन भारतात हाेते. सुमारे 21.90 लाख हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड असून 21,207 दशलक्ष नारळांचे उत्पादन हाेते. भाैगाेलिक क्षेत्रात भारत तिसèया क्रमांकावर असला तरी उत्पादनात ताे प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये नारळाचे उत्पादन मुख्यत्वे काेकण किनारपट्टीवर घेतले जाते. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये नारळ लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. अलिकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातही नारळ लागवडीचा विस्तार हाेत आहे. काेकणात पारंपरिकरित्या ’बाणवली’ या उंच नारळाची लागवड केली जाते. नारळाचा उपयाेग शहाळे, ओले खाेबरे, तेल काढणे आणि काथ्या उद्याेगासाठी माेठ्या प्रमाणात हाेताे. डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठातील प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे सन 2011 पासून भारतामध्ये विकसित झालेल्या विविध नारळ जातींचा तुलनात्मक अभ्यास सुरू करण्यात आला हाेता. या प्रयाेगाच्या निष्कर्षानुसार, ’केरा केरलम’ हे नारळाचे वाण अधिक उत्पादन देणारे आणि आशादायी असल्याचे दिसून आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button