रत्नागिरी जिल्ह्यातील २८ सहायक पोलिस उपनिरीक्षकांना बढती

रत्नागिरी : जिल्ह्यातील 28 सहायक पोलिस उपनिरीक्षकांच्या बढतीचे आदेश 30 मे रोजी पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाले. पोलिस दलातील या बढती कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अधिकार्‍यांची संख्या वाढली आहे. नाईक संवर्गातील कर्मचार्‍यांना बढती देण्यापूर्वी सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावरील कर्मचार्‍यांना बढती देण्याचे आदेश देण्यात आले होेते. पोलिस दलात 30 वर्ष सेवा तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून तीन वर्ष सेवा बजावलेल्या कर्मचार्‍यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये
आनंदराव पवार (गुहागर), यशवंत बोडक (कशेडी), रवींद्र तारये (मुख्यालय), लक्ष्मण इंधन (रत्नागिरी शहर), शांताराम वाघ, धर्मराज चव्हाण, नामदेव उंडे (मुख्यालय), जितेंद्र घाणेकर (खेड), दीपक साळवी (ग्रामीण), प्रदीप सुपल, संतोष पवार, संभाजी जाधव (मुख्यालय), मुकुंद देसाई (ग्रामीण), जगदीश करगुटकर (मुख्यालय), राजेंद्र देसाई (लांजा) , जयवंत सोनावळे (दापोली), दत्‍ता पवार (बाणकोट), अविनाश पवार (देवरूख), संगम कांबळे (मुख्यालय), रमेश जानवलकर (सावर्डे), दत्‍ताराम आखाडे (मोपवि), रघुनाथा मोंडुला (ग्रामीण), अनंता बसवंत (मुख्यालय), नाना शिवगण (सुरक्षा), धोंडू गोरे (दापोली), सुरेश खरात (अलोरे), भगवान पाटील, शालन शिंगाडे (रत्नागिरी शहर) यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button