
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे गळफास घेणार्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू.
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे गळफास घेणार्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मासुम अजगर दर्वेश (२४, रा. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.मासूम याने २६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास राजीवडा येथे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी येथे दाखल केले.
गळफास घेतल्याने प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत होते. मात्र रात्री १२ च्या सुमारास मासुमचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com