
आज एका संघर्षमय प्रवासाचा शेवट झाला…
.कुमार शेट्ये साहेब ह्यांचा एक संघर्षमय प्रवास मी माझ्या डोळ्यानी अनुभवला आहे….माझ्या राजकिय जीवनातील सुरुवातीचे त्यांचे योगदान मी कधीच विसरू शकत नाही….! 2004 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या तिकिटाच्या शिफारसी पासून मला निवडून आणण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा होता….राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर मी शिवसेनेत आलो तरी त्यांनी माझा द्वेष केला नाही….आज ते आपल्यातून निघून गेले ही बातमी ऐकल्यावर फार वाईट वाटले…..एक तळागाळात राहणारा सातत्याने जनतेशी संपर्क असलेल्या नेता हरपला ह्याची जाणीव झाली…! अनेक संकटावर मात करून जनसामान्यात रमणारा दिलदार नेता आज आपल्यात नाही ह्याचे दुःख आहे…..कुमार शेट्ये साहेबांना
भावपूर्ण श्रध्दांजली
*उदय सामंत*