
कोकणच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
कोकणच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोकणात 1 झाड तोडलं तर 50 हजार रुपये दंड होत होता, यावर आज स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसं विधेयक आज मुख्यमंत्री यांनी पास केलं आहे.त्यामुळे अनेक कोकणी लोकांना दिलासा मिळणार आहे. कोकणातील वृक्षतोडीसंदर्भातील विधेयकावर ते म्हणाले की, “हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. परवानगी घेऊन झाडं तोडून उपजिविका करणारे जे शेतकरी, लोक आहे त्यांच्यावर फार मोठं संकट आलं होतं.
मी यासंबंधी विधेयक मांडलं. मुख्यमंत्री त्यावेळी सभागृहात होते. त्यांनी सांगितलं की, हे 50 हजार दंडाचं जे विधेयक आहे ते आम्ही स्थगित करत आहोत. हा दंड होणार नाही. भविष्यात हा दंड वाढवला पाहिजे हे निश्चित आहे. पण दंड वाढवताना तेथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन, चर्चा करुन, विचार विनिमय करुन हे विधेयक पुन्हा आणलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.