
उदय सामंत यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी?
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीमधून पाचवेळा विजयी झालेले उदय सामंत हे आपले मोठे बंधू किरण सामंत यांच्यासह शनिवारी रात्री तातडीने मुंबईला रवाना झाले.राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात उदय सामंत यांना कोणती जबाबदारी मिळते, याकडे रत्नागिरीसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले असतानाच त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे.रविवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी आमदारांची बैठक घेतली. महायुतीमधील तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठका सुरु असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद कुणाला यावर चर्चा झडत आहेत. नव्या मंत्रिमंडळात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाते, याकडेही जिल्हावासीयांसह कोकणाचे लक्ष लागले आहे.