तुम्ही १८ जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन-भाजपचे नेते आशिष शेलार
लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून राज्यात आता प्रचारांचा धडका सुरू झाला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप ४०० पारचा नारा देत आहे. पण भाजपला संपुर्ण देशात ४५ जागाही जिंकता येणार नाहीत.असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला.त्यावर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पलटवार केलाय.उद्धव ठाकरे हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर माझं जाहीर आव्हान आहे की, भाजप पक्ष हा ४५ जागांच्या वर गेला तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो की महाराष्ट्रात २०१९ मध्ये आमच्यामुळे १८ जागा जिंकलात. पण आता महाविकास आघाडीमुळे तुम्ही १८ जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन. उद्धव ठाकरे यांना माझं खुलं आव्हान आहे. असंही आशिष शेलार म्हणाले.www.konkantoday.com