
मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तक्रार करणार; पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची टीका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आरबीआयच्या स्थापनेला आज 90 वर्ष होत असून 91 व्या वर्षात पदार्पण होणार आहे. त्यामुळे आरबीयच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. मात्र नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुणीही पंतप्रधान नसतो. मात्र तरीही मोदी सरकारी पैशातून दौरा करत आहेत. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे आता देशाचे प्रधानमंत्री नाहीत. निवडणुकांची घोषणा झाल्यावर राज्यात आणि देशात मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान हे कार्यवाहक असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणाचा वापर करून त्यांना प्रचाराला जाता येत नाही. सरकारी विमान आणि फौजफाटा घेऊन गेल्यास निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजेत. त्यांचा एक एक दौरा हा 25 कोटींचा असतो. आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.www.konkantoday.com