
गणपतीपुळेत कासवांच्या अंड्यांसाठी संवर्धन केंद्र
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील रमणीय किनार्यावर सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कांदळवन विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. श्री गणेश मंदिरानजिकच कासवांच्या अंड्यांसाठी संवर्धन केंद्र उभारण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १६ किनार्यांवर सागरी संरक्षण, संवर्धन हा उपक्रम कांदळवन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी कासव मित्रांची निवड करण्यात आली असून गणपतीपुळेसाठी ऋषिकेश जोशी कासवमित्र म्हणून काम करणार आहेत. मालगुंडसाठी आदित्य मयेकर कासवमित्र म्हणून काम करणार आहेत.www.konkantoday.com