
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या पाच महिन्यात ३८० जणांना सर्पदंश.
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात काम करतेवेळी तसेच घराच्या आजुबाजूच्या परिसरात वावरताना अनेकजणांना सापांच्या डंखाचा सामना करावा लागत आहे. गेया ६ महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३८० जणांना सर्पदंश झाल्याची आकडेवारी जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.जिल्हा आरोग्य विभगाने जिल्ह्यातील ग्रामीण स्तरावर असलेल्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सर्पदंशावर उपचारासाठी मुबलक लस उपलब्ध ठेवली असल्याचे सांगण्यात आले आहे.www.konkantoday.com