
ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यास आंबा बागायतदारांचे गणित बिघडणार.
कोकणात यावर्षी पावसाने सरासरीपेक्षा अधिक बरसात केलेली आहे. पावसाचा हा आलेख १५ ऑक्टोबरपर्यंत असाच वरचढ राहिला तर आंबा व्यापार्यांचे व आंब्यावर अवलंबून असणार्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते. सध्या बंगालच्या उपसागरात व लक्षद्वीप केंद्राजवळ हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम होवून जर १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत राहिला तर आंबा हंगाम लांबणीवर पडू शकतो. मात्र या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम नाही झघला आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस नाही पडला तर आंबा वेळेत येईल अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ डॉ. व्ही. जी. मोरे यांनी दिली.www.konkantoday.com