पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिंदे शिवसेनेचा दावा सांगितल्याने भाजपला बसणार फटका


पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिंदे शिवसेनेचा दावा सांगितल्याने या मतदारसंघात इच्छुक असलेल्या भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे
सध्या शिवसेनेचे खासदार असलेल्या जागांवर आम्ही लढण्यासाठी आग्रही असून उमेदवारांची तयारीही केली आहे. त्यामुळे रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेकडे राहणे नैसर्गिक न्यायाला धरुन होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
या मतदारसंघात भाजपाला चांगला जनाधार असल्याने ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंची मागणी असल्याचे भाजपाचे या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी दोन दिवसांपूर्वी नमूद केले होते या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून सामंत यांनी या जागेवर दावा केला आहे. ते म्हणाले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार आहेत. सर्व राजकीय पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीतर्फे या निवडणुका एकत्रितपणे लढवल्या जातील. पण सध्या शिवसेनेचे खासदार आहेत त्या जागा शिवसेना लढवेल, हे स्वाभाविक आहे.

रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्या दृष्टीने आम्ही उमेदवारांची तयारी केली आहे. जागा वाटपाचा अंतिम निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील. पण माझे बंधू किरण सामंत येथून रिंगणात उतरण्यास तयार असतील तर साडेतीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा विजय निश्चितपणे होईल. आता याप्रकरणी भाजपाची काय भूमिका राहणार याकडे लक्ष लागले आहे
www.konkantodaday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button