
अध्यक्ष जिल्ह्याचे असूनही जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळात अनेक पदे रिक्त.
करंबवणे खाडीत जलप्रदूषण, लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या घटना, प्रदूषणावरून नागरिकांची आंदोलने, असे सारे काही घडत असतानाच आणि खेडचे सुपुत्र सिद्धेश कदम यांच्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद असताना त्यांच्या अखत्यारितील येथील उपप्रादेशिक कार्यालयाला गेल्या महिनाभरापासून एकही अधिकारी नाही. या कार्यालयातील अधिकार्यांच्या महिनाभरापूर्वी बदल्या झाल्यानंतर बदली अधिकारी येण्यापूर्वीच कार्यररत अधिकारी निघून गेले आहेत. कोकणातील मोठा रासायनिक झोन असलेल्या लोटेसह ५ औद्योगिक क्षेत्रांची धुरा सांभाळणार्या या कार्यालयासह रत्नागिरीतही सक्षम अधिकारीच नसल्याने सध्या प्रदूषणाचे नियंत्रण पुरते कोलमडून पडले आहे. www.konkantoday.com