दापोलीत गाढवांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा, नागरिकांची संतापाची भावना.

दापोली शहरात गाढवांचा वावर मुख्य रस्त्यावर वाढला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र दापोली शहरात पहायला मिळत आहे.दापोली शहरात भटक्या श्‍वानांचा, गुरांचा त्रास असतानाच आता गाढवांचा वावर देखील वाढला आहे. ही गाढवं मुख्य रस्त्यावर मध्येच उभी राहत असून इकडे तिकडे फिरत असतात. यामुळे वाहन चालवताना मोठी समस्या निर्माण होते.आधीच शहरामध्ये वाढणारी वाहनांची गर्दी मोठी असते. त्यात भटके श्‍वान, गुरे यांचा वावर सुरू असतो. तर आता गाढवांची भर पडली आहे. तरी दापोली नगरपंचायतीने या गाढवांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दापोलीकरांकडून व वाहन चालकांकडून जोर धरत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button