गणेश विसर्जना ला गणेश भक्तांनी भाटे चौपाटी ला जास्त पसंती दिली.

मांडवी किनाऱ्यापेक्षा ह्या वर्षी गणेश विसर्जना ला गणेश भक्तांनी भाटे चौपाटी ला जास्त पसंती दिली . झरी विनायक पासून भाटे ब्रिज पर्यंत मोकळा पर्यावरण पूरक समुद्र किनारा गणेश भक्तांना अधिक भावला. संपूर्ण सुरू बनात गाड्या ची पार्किंग करता येत होती . गाड्या सरळ समुद्र किनारी नेता येत असल्याने विसर्जनासाठी वेळ लागत नव्हता त्या उलट मांडवी समुद्र किनारी गर्दी ह्या वर्षी कमी दिसून आली. त्याला कारण म्हणजे संपूर्ण किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा घातल्याने किनाऱ्या वरील जागा कमी झाल्याने पार्किंग चा प्रश्न हा निर्माण झाला . त्यातच भूते नाक्यावरून गणपती विसर्जन करणऱ्या वाहाना न व्यतिरीक्त कोणत्याही वाहांनाना प्रवेश दिला जात नसल्याने भाविक त्रासले असल्याने बहुतांशी विसर्जन भाटे येथेच झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button