
मासळी कर आकारणीवरून मच्छिमारांमध्ये नाराजी
मासेमारी हा अनिश्चित उद्योग असून गेल्या काही वर्षापासून तोट्यात चालला आहे. अशावेळी मासळी वाहतुकीवरील बंद झालेली कर आकारणी पुन्हा सुरू करण्याबाबतचे नियोजन जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जात आहे. त्यामुळे मच्छिमार आणि बाजार समितीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला होणारा तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मत्स्य वाहतुकीवर कर आकारणीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मासेमारी कृषी क्षेत्रात मोडत असली तरी शेतकर्यांना कृषीचे जे लाभ मिळतात ते मच्छिमारांना मिळत नाहीत. त्यामुळे मत्स्य वाहतुकीवरील कर सुरू केला जाणार असल्याने मच्छिमारांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com