आर्जू टेकसोल कंपनीत फसवणूक झालेले नागरिक 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार

* स्थानिक बेरोजगारांना रोजगारीचे अमिष दाखवून त्यांना प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या आर्जू टेकसोल कंपनी विरुद्ध फसवणूक झालेल्या नागरिकांच्यात संतापाचे वातावरण आहे कंपनीकडून आमची मूळ मुद्दल रक्कम परत मिळवून द्यावी या मागणीसाठी आता फसवणूक झालेले नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 ऑगस्ट ला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे याबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहेआर्जू टेकसोलकंपनीने जाहिरात बाजी करून रत्नागिरीतील एमआयडीसीत जागा घेऊन त्या ठिकाणी बेरोजगार युवकांना यंत्रसामुग्रीत गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवले व तयार केलेला माल परत घेण्यात आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात कोणत्याही मोबदला न देता या बेरोजगार नागरिकांची मूळ रक्कमही परत न करता मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली होती या फसवणुकीचा आकडा रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून अनेक कोटीच्या वर गेला होता फसवणूक झालेल्या बेरोजगार नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते त्यात त्यांनी असे म्हटले होते की आम्ही सर्वजण आर्जू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी या कंपनीमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स बनवण्याचे पत्रक वाचून कंपनीच्या बँक खाते किंवा रोख रकमेने पैसे भरले जेणेकरून त्यांचे प्रोडक्स बनवून आम्हाला उत्पन्नाचे एक साधन होईल हा आमचा एकमेव शुद्ध हेतू होता परंतु आर्जू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आमच्यासारख्या अनेक जणांची फसवणूक करून आमची मूळ मुद्दल तर परत दिली नाहीत उलट आम्हाला आर्थिक संकटात टाकले आहे तरी आपण जातीने लक्ष घालून आम्हाला मूळ रक्कम परत मिळवून द्यावी अन्यथा आम्ही सर्वजण 15 ऑगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आमरण उपोषणाला बसणार आहोत त्यानंतर होणाऱ्या जीवित वित्तहानी आपण जबाबदार असाल असे या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे याबाबत प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे या निवेदनावर विलास सुर्वे दिपराज शिंदे यांचे सह अनेक फसवणूक झालेल्या नागरिकांच्या सह्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button