ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

महाराष्ट्रात यापूर्वी अनेक पक्षाचे अनेक लोक राजकारण करून गेले. पण, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांनी जितकी संपवली, खराब केली आणि नासवली. फडणवीसांनी जे सुडाचे राजकारण केले, तसं राजकारण यापूर्वी कोणीही कधीही केलेले नव्हतं, त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवायची आणि नाही टिकवायची, याचा विचार महाराष्ट्राने करायचा आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.महाराष्ट्राने विचार करायचा आहे की, राजकारणात आता कोणाला ठेवायचे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण हे राज्याला विचार करायला लावणारे आहे. त्यांची यापूर्वीची भाषणे पाहिली तर इतकं रागावून, चिडून, निर्वाणीचं, निखराचं आणि आर या पारचे भाषण कधीही त्यांनी केलेले नाही. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यांनी ललकारले आहे.देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्राने पाच वर्षे मुख्यमंत्रिपद दिलं. त्या मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं. राजकारण आणखी मजबूत करायलं पाहिजं होतं. पण त्याऐवजी फडणवीसांनी आपल्या मित्रांना, विरोधकांना आणि स्वपक्षीयांना संपविण्याचा सपाटा लावला होता. त्यातीलच एक भाग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत केला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button