मुसळधार पाऊसामुळे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट रस्ता खचला सुरक्षेच्या दृष्टीने घाट बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्‍या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळला आहे.त्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलिकडे तब्बल चाळीस गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. रघुवीर घाट हे प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे. दररोज शेकडो पर्यटक या घाटामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जातात, त्याच पार्श्‍वभूमीवर ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा घाट बंद करावा, अशी मागणी खोपी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button