सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद

लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागंल आहे. यावेळी सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री म्हणाल्या.काय स्वत होणार?सोनं, चांदी स्वस्त होणारसोनं-चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 6 टक्के आयात करमोबाईल हँडसेटमोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणारमोबाईलचे सुटे भागकॅन्सरवरची औषधेपोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलतलिथियम बॅटरी स्वस्तइलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणारसोलार सेट स्वस्त होणारचामड्यांपासून बनणाऱ्या वस्तूपीवीसी फ्लेक्स बॅनरविजेची तारकाय महाग होणार?प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणारप्लास्टीक उत्पादने महाग होणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button