
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येणारे बेमुदत उपोषण रद्द
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या शासनाने मान्य केल्याने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे.शिवाय दि. १३ सप्टेंबर पासून रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येणारे बेमुदत उपोषण रद्द करण्यात आले आहे.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्या समवेत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करून काही मागणी मान्य करण्यात आल्या आहेत. महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती मात्र ३८ टक्केवरून ४२ टक्के वाढ करण्यासाठी परवानगी दिली. सण, उत्सव अग्रीमाची रक्कम १० हजार वरून १२ हजार ५०० रूपये करण्यास मान्यता देण्यात आली. मागील महागाई भत्त्याच्या थकबाकी तसेच घरभाडे भत्ता व वेतनवाढीतील फरकाबाबत येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री यांच्या समवेत संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येणार आहे.
www.konkantoday.com