महामार्ग जनआक्रोश समितीकडून रखडलेल्या महामार्ग कामाच्या गतीसाठी आठवड्याची डेडलाईन

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षापासून रखडले आहे. धिम्या गतीने सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे वाहनचालकांचा मनस्ताप अजून कायम आहे. त्यातूनच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी वागत आहे. रखडलेल्या महामार्ग कामाच्या गतीसाठी आठवडाभराची डेडलाईन देत तसे न झाल्यास महामार्गावरील पळस्पे ते रत्नागिरीदरम्यान रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा महामार्ग जनआक्रोश समितीने दिला आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या रखडपट्टीसह निकृष्ट दर्जाचे बांधकाम, अपूर्णावस्थेतील काम व जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुुळे यंदाच्या पावसाळ्यातही वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी सातत्याने विविध संघटनांनी आंदोलने छेडून सरकारला जागे करण्याचाही प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी दिलेली आश्‍वासने हवेतच विरली आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button