
संगमेश्वर तालुक्यात सर्पदंश झालेल्या ९२ शेतकर्यांना जीवदान देण्यात आरोग्य विभाग यशस्वी
शेतीची कामे करीत असताना सर्प दंशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. संगमेश्वर तालुक्यामध्ये गतवर्षी १२ जणांना सर्पदंश झाला होता. या सर्वांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे.उन्हाळा संपल्यावर शेतकरी शेतामध्ये भात पेरणी व उखळीसाठी कार्यरत होतो. तत्पूर्वी चार महिने या शेतामध्ये कोणाचाही वावर नसल्याने सर्प व सरपटणारे प्राणी या शेतात आपला रहिवास करत असतात. पेरणी व नांगरणी वेळी शेतकरी पुन्हा शेतात सक्रीय होतो. यावेळी शेतातील रहिवास असलेल्या या सरपटणार्या प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहोचतो. भात कापणी प्रसंगी हेच सरपटणारे प्राणी पुन्हा एकदा शेतकर्यांना दंश करताना दिसतात, अशा प्रकारे संगमेश्वर तालुक्यात ९२ शेतकर्यांना गतवर्षी सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आरोग्य विभागाकडे याबाबतच्या प्राथमिक केंद्रनिहाय नोंदी करण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com