शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना भूसंपादनासाठी अधिसूचना जारी

कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शेतकर्‍यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला नसून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडूनसुद्धा विरोध सुरू झाला आहे. नागपूरधील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा विरोध सुरू आहे. या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ५९ गावांमध्ये शेकडो एकर जमिनी प्रभावित होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून एकमुखाने होत आहे.मात्र हा विरोध डावलून राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बाय रोड १८ तासांचा कालावधी लागतो. मात्र, शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांचे होणार आहे. राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्सप्रेस वे असेल. आठ हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे देण्यात आले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button