
मुंबई-गोवा महामार्गावरील पथदीप बसवण्यासाठी ८० कोटी रूपये मंजूर
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. मात्र महामार्गावर बर्याच ठिकाणी पथदीपांच्या उजेडाची वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. महामार्गावरील पथदीप बसवण्यासाठी तब्बल ८० कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे.भरणेतील उड्डाण पुलावर उभारण्यात आलेल्या पथदीपांना उजेडच नसल्याने वक्रकार वळणावर सातत्यााने अपघात घडत आहेत. मात्र तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग गाते निद्रिस्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चौपदरीकरणामुळे महामार्गावरून धावणार्या वाहनचालकांचा प्रवास गतीमान झाला असला तरी अजूनदेखील नानाविध सुविधांचा अभाव आहे. चौपदरीकरणात सर्व्हिस रोडसह आवश्यक त्या ठिकाणी पुलांची कमतरता असल्याचा सूर आढळला जात आहे. www.konkantoday.com