रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर समुद्राला आले उधाण
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर समुद्राला मागील २ दिवसात उधाण आल्याचे पहावयास मिळाले. ४ मे रोजी सकाळी ११.३० वाजल्यापाासून ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत उंच लाटा उसळल्या. भरतीच्या वेळी या लाटांच्या उंची दीड मीटरपर्यंत वाढली असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे कुठेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉमेशन सर्व्हिसेस या संस्थेने भारतातील पश्चिम किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्याच्या किनारी भागातील लोकांना समुद्रात न जाण्याचा व सावधानता बाळगण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रविवारी सायंकाळी रत्नागिरी व सिंधुदुर्ग किनारी भागात लाटा उसळल्याचे दिसले.www.konkantoday.com