रतन टाटा यांच्या नावाने उद्योग रत्न पुरस्कार.

रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, असा प्रस्ताव पाठवला आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. रतन टाटा याना जो पहिला उद्योग रत्न पुरस्कार देण्यात आला होता. तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय मुंबई इथं उद्योग भवन उभारलं जात असून त्याला रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे. ठाणे रत्नागिरी आदी कामासाठी सीएसआर मधून 500 कोटी रुपये रतन टाटा यांनी दिले होते. नवीन उद्योग भवन हे 700 कोटींचे होत आहे याला नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रधांजली असेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button