मोदींचे हात बळकट करण्यासाठी रायगड मतदार संघातून हक्काचा माणूस दिल्लीला पाठवा -आ. योगेश कदम

देशामध्ये मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला रायगड लोकसभा मतदार संघातून हक्काचा माणूस दिल्लीला पाठवायचा आहे. तटकरेंच्या रूपाने या मतदार संघाला केंद्रीय मंत्री पद निश्‍चित मिळेल व आतापर्यंत रखडलेला विकास नक्कीच मार्गी लागेल, असे सांगतानाच यापूर्वी जे खासदार होते त्यांच्यासमवेत आम्ही काम केले आहे. त्यांच्याकडे विकास कामांचे कोणतेच व्हिजन नाही, असे मत दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दापोली विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार खा. सुनिल तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मार्गदर्शन करताना आमदार योगेश कदम म्हणाले की, दापोली मतदार संघामध्ये सर्व महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चांगला समन्वय असून देशामध्ये पंतप्रधानपदी पुन्हा मोदींना विराजमान करण्यासाठी सर्व एक दिलाने काम करीत आहेत. संपूर्ण रायगड लोकसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे दापोली विधानसभा मतदार संघातून दिले जाईल, असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button