धरण दुरूस्तीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने कळवंडेसह चार गावात सह्यांची मोहीम

चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या दुरूस्तीकडे शासन व लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने कळवंडेसह कोंढे, पाचाड, रेहळ-भागाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यातूनच सोमवारी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार कायम ठेवण्यासह चार गावात लोकप्रतिनिधींना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच पुढील भाग म्हणून मंगळवारपासून ग्रामस्थांच्या सह्या घेण्यास सुरूवात करण्यात आली असून त्यानंतर १८ रोजी जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांच्यासह अन्य अधिकार्‍यांना निवेदने दिली जाणार आहेत.कळवंडे धरण लघु पाटबंधारे विभागासाठी आंदण असून आतापर्यंत गरज नसतानाही करोडो रुपयांची उधळण त्याच्या दुरूस्तीवर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. सध्या दुरूस्तीची गरज नसतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांनी कळवंडे धरणाची वाट लावली आहे. त्यामुळे सध्या वरील चार गावांना पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button