देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती-चंद्रकांत पाटील

* उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती.मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहित आहे. पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, असं धक्कादायक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलपूरची निवडणूक कठीण नाही आहे. माढ्याची निवडणूक कठीण नाही ती कठीण केली आहे. ईश्वराला सगळ्यांची काळजी आहे. तो त्याचे संतुलन बरोबर करत असतो. मी राज्याचा अध्यक्ष होतो 33 महिने आम्ही काय सहन केल आहे हे आम्हाला माहित आहे. पण मला खात्री होती हे देखील दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. त्यामुळे चांगले काम करत राहा. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button