कोकणात कोणताही प्रकल्प आला की विरोध करण्याचे काम शिवसेनाच करते -ना. नारायण राणेंचा गंभीर आरोप
कोकणात कोणताही प्रकल्प आला की विरोध करण्याचे काम शिवसेनाच करते. शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी जन्माला आली, कोकणातील मराठी माणसाच्या मुळावर उठली, शिवसेनेने मराठी माणसाला सक्षम नाही केलं तर मातोश्रीला सक्षम केले. मराठी माणूस, हिंदुत्वाशी बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच तडजोड केली नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी लोकहिताचे कोणते काम केले असा सवाल केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावातील शुभगंधा मंगल कार्यालयात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ना. नारायण राणे बोलत होते. www.konkantoday.com