जनतेचे पाणी पळविणार्‍या या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नका, -निलेश राणे

सध्याच्या खासदाराने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी कोणतेही काम केलेले नाही. जनतेचे पाणी पळविणार्‍या या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नका, अशी टीका करीत भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. मोदींच्या ४०० पारच्या खासदारांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील आपला हक्काचा महायुतीचा खासदार देशाच्या संसदेत पाठवू या, असे आवाहन त्यांनी सोमवारी पेढांबे येथील महायुतीच्या मेळाव्यात केले.यावेळी आमदार मधुकर चव्हाण, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, युवक तालुका अध्यक्ष निलेश कदम, भाजप प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, खेर्डीचे माजी उपसरपंच विनोद भुरण, सौ. स्नेहा मेस्त्री, मनसे माजी चिपळूण तालुकाध्यक्ष राजेंद्र राजेशिर्के, भाजप कामगार मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button