सोमवारी मुंबईच्या तापमानात अचानक चार अंश सेल्सिअसची वाढ

मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात उष्णतेच्या लाटेने झाली. सोमवारी मुंबईच्या तापमानात अचानक चार अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता.शहराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस होते, तर ठाणे आणि कल्याणमध्ये पारा चाळिशीपुढे गेल्याची नोंद झाली. आज, मंगळवारीही हेच चित्र असेल, असा होरा आहे. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, तापलेले रस्ते, लोकलमध्ये लागणाऱ्या उष्णतेच्या झळा आणि ३७ अंश नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची सोमवारी लाहीलाही झाली. उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता.www.konkantoay.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button