जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार?

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तिन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून खितपत पडलेला आहे. त्यावर वारंवार बैठका, निवेदने, चर्चा आणि आश्‍वासने या व्यतिरिक्त प्रकल्पग्रस्तांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे न्यायाची प्रतीक्षा करून थकलेली रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या ३ जिल्ह्यातील १८००० कुटुंबे येत्या लोकसभा निवडणुकीतील होणार्‍या मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिनीने दिला आहे.येत्या ७ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरीच्या मुख्य रेल्वे स्थानकावर व रत्नागिरी येथील कोकण रेल्वेच्या प्रबंधक कार्यालयावर ढोल-ताशे घेवून जनआक्रोश आंदोलन करणार आहे. तसेच घेराव घालून कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय नोंदवणार असल्याचा इशारा कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने घेतल्याचे अध्यक्ष विनायक मुकादम यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button