- कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथील अलसुरे बोगद्यात केबलचे काम करणाऱ्या कामगारांना रेल्वेची धडक बसल्याची घटना घडली आहे सोमवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. या बोगद्यामध्ये केबलचे काम सुरू असताना सावंतवाडी हून दिव्या कडे जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून पाच कामगार गंभीर जखमी झाले. अपघातात यशवंत तुकाराम राठोड ( वय ५५ वर्षे, रा. हवेरी तांडा, ता. जिल्हा विजापूर – राज्य कर्नाटक ) हा मजूर मयत झाला असून दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर दोन कामगार गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेच्या सखोल तपासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती गठीत केल्याची माहिती देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्टेशन आणि अंजनी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान असणाऱ्या अलसुरे बोगद्यामध्ये केबल टाकण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्या दरम्यान जाणाऱ्या रेल्वेने पाच कामगारांना ठोकर दिली. या अपघातात बोगद्यामध्ये काम करणारे पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील काही कामगार बोगद्याच्या बाहेर येऊन आरडाओरड करू लागले. ही खबर अलसुरे गावात पोहोचल्या नंतर गावातील स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमी कामगारांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात यशवंत तुकाराम राठोड ( वय ५५ वर्षे, रा. हवेरी तांडा, ता. जिल्हा विजापूर – राज्य कर्नाटक ) हा मजूर मयत झाला असुन जेमलोआप्पा तिरुपती राठोड (वय ६० वर्षे, रा. गेदलमरी ता. मुद्दे बिहाल जिल्हा विजापूर, व अशोक तुकाराम राठोड (वय ५३ वर्षे, रा. हितनळी तांडा, ता. देवर हिप्परगी जि. विजापूर राज्य कर्नाटक) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. तर सुनिता रमेश राठोड (वय ४५ वर्षे, रा. हेतनळी तांडा ता. जि. विजापूर) ही जखमी झाली आहे. www.konkantoday.com
Back to top button