लांजा – ‘निर्भय बनो सभे’त सरकारवर ताशेरे

शेतकरी, कामगार, आदिवासी, मच्छीमार आणि बहुजन समाज यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार करत आहे. या देशातून भाजप आघाडीला तडीपार करा तरच हा देश आणि येथील जनता वाचेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विचारवंत उल्का महाजन यांनी लांजा येथील निर्भय बनोच्या व्यासपीठावरून केले.निर्भय बनो, भारत जोडो, निर्धार महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत लांजा तालुका सोसायटीसमोरील मैदानात जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. दिलीप सोळंकी, मुख्य संयोजक नाना मानकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते तर या प्रसंगी आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकार, तालुकाप्रमुख संदीप दळवी, बबन मयेकर यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनतादल, विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी हजेरी लावली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button