
रत्नागिरी जिल्हात मालवाहतुकीमुळे एसटी महामंडळाला दिलासा
प्रवासी संख्या घटल्यामुळेच महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी मालवाहतुकीमुळे तेवढाच दिलासा प्राप्त होत आहे.
मालवाहतुकीमुळे एस.टी.ला चांगला प्रतिसाद लाभत असल्याने मालवाहतूक ५० गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीसोबतच आता जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मालवाहतूक सेवा सुरू झाली आहे.आंब्यापेट्यापासून मालवाहतूक सुरू झाली. त्यानंतर चिरा, सिमेंट, वाळू, खत, पाइप, पत्रे, साखर, रोपे आदी विविध प्रकारच्या वस्तूंची वाहतूक सुरू आहे. मालवाहतुकीसाठी कारखानदार, उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. पाच मालगाड्यांपासून सुरुवात झाल्यानंतर आता मालवाहतुकीच्या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
www.konkantoday.com