राजापूर नगरपालिकेने अतिक्रमण करणार्‍यांना नोटीसांवर भागविले

अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्त्यावरून वावर करण्यासाठी देखील यातायात करावी लागत असल्याने नागरिकांच्या प्रचंड तक्रारीनंतर राजापूर नगर परिषदेचा मूड बदललेला दिसत आहे. तक्रारींच्या आधारे न.प.च्या आरोग्य विभागाने बाजारपेठेत अतिक्रमण केलेल्या २८ जणांना नोटीसा बजावण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. मात्र त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई केव्हा, हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीत आहे. अतिक्रमण करणार्‍या जागा मालकांना कितीवेळा नोटीसा देणार वा त्यांचा मूल्यांकन दाखला प्रतीवर्षी देतच राहणार का, असा प्रश्‍न सोशिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button