
चिपळूण तालुक्यातील रेहेळे युवतीचे अपहरण झाल्याची फिर्याद
चिपळूण:तालुक्यातील रेहेळे भागाडी येथे रक्षाबंधनासाठी बाहेर पडलेली १६ वर्षाची युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे.या भागात राहणारे पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी सकाळी राखी बांधण्यासाठी पाग येथे जाते असे सांगून बाहेर पडली परंतु ती संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही. तिचा शोध घेवूनही ती सापडली नाही. यामुळे तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात केली आहे.
www.konkantoday.com