रत्नागिरीतील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी कोकणात प्रथमच १२ मजल्याची टोलेजंग इमारत उभी राहणार

रत्नागिरीतील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी कोकणात प्रथमच १२ मजल्याची टोलेजंग इमारत उभी राहणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून शासनाकडून मंजूर झालेल्या सुमारे १२३ कोटी ९० लाख रुपये खर्चाच्या या भव्य प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाला सुरूवात झालेली आहे. लवकरच राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे.रत्नागिरी पोलीस मुख्यालयात यापूर्वीच्या ब्रिटीशकालीन कर्मचारी वसाहतीत सुमारे २० चाळी बांधलेल्या होत्या. त्या इमारतीच्या बांधकामाला अनेक वर्षे झाल्याने ती वसाहत नादुरूस्त झालेली होती. काही चाळी मोडकळीस आल्या होत्या. पण आता नव्याने पोलीस अधिक्षक कार्यालयासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थान उभारणीचे काम येथील पोलीस मुख्यालयाच्या वरच्या भागात सुरू झालेले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button