चुलतीचा खून करुन फरार झालेला पुतण्या प्रकाश हरचिलकर अखेर चार दिवसानंतर पोलिसांच्या कचाट्यात

मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे चुलतीचा खून करुन फरार झालेला पुतण्या प्रकाश हरचिलकर अखेर चार दिवसानंतर मंगळवारी पोलिसांच्या कचाट्यात सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला लोटे एमआयडीसी आवाशी दाभीळ फाटा परिसरातून ताब्यात घेत अटक केली.प्रकाश गणपत हरचिलकर (49, वालोपे- चिपळूण) असे अटक केलेल्या खूनी पुतण्याचे नाव आहे. वारकरी असलेल्या लक्ष्मी हरचिलकर या पंढरपूर येथील वारी करुन वालोपे येथे त्याच्या राहत्या घरी आल्या होत्या. असे असताना 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शेतकामासाठी लक्ष्मी हरचिलकर गेल्या होत्या. यावेळी पुतण्या प्रकाश हरचिलकर याने एकटे गाठून जमीन वादाच्या रागाने त्यांच्या लक्ष्मी यांच्या डोक्यात खिळा मारुन त्यांचा खून केला. शिवाय या घटनेतील क्रूरता म्हणजे खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने शेतामध्येच लक्ष्मी यांचा मृतदेह टायरसह पेंढा टाकून जाळला. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गेलेल्या लक्ष्मी हरचिलकर दुपार २ वाजले तरी घरी न परतल्याने त्यांच्या शोधासाठी मुलगा विनोद हरचिलकर हे शेतात आले असता हा खूनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पुतण्या प्रकाश हा दुचाकीवरुन वालोपे येथून पसार झाला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button