
शेतकर्यांना काजू बी प्रतिकिलो 200 रु.दराची अपेक्षा असताना, केवळ १२६ रुपये दर
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील भागात काजू हंगामाला सुरुवात झाली असून, जिल्ह्याच्या काही भागांत काजू बी परिपक्व होऊ लागली आहे. दरम्यान, बागायतदार शेतकर्यांना काजू बी प्रतिकिलो 200 रु.दराची अपेक्षा असताना, केवळ १२६ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्यांतून नाराजीचा सूर उमटत असून, पुन्हा एकदा काजू बीच्या हमीभावाची निश्चित करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे या वर्षी काजूला पालवी आणि मोहोर विलंबाने आला. त्या नंतर हवामान बदलाचा मोठा परिणाम काजू पिकावर झाला आहे. जिल्ह्यात दोन-तीन टप्प्यांत काजूला मोहोर आल्यामुळे काजू हंगाम तीन टप्प्यांत विभागणार, हेही स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com