*अनाथ बालके, महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना*

__महाराष्ट्र शासनाच्या नवीन मिशन वात्सल्य योजनेंतर्ंगन आता लाभार्थ्यांना शासन दरबारी जावे न लागता, आता शासनाने कर्मचारीच ही योजना लाभार्थ्यांपर्यंत घेवून येणार आहेत. मिशन वात्सल्य योजना या मिशननुसार गावपातळीवर तुमच्या गावाचा तलाठी, तुमच्या गावचा जो ग्रामसेवक असेल तो तुमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा मधील प्राथमिक शिक्षक, तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका इत्यादी ह्या सहभागी होवून घरोघरी जावून अर्ज भरवून घेणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना तसेच एकाच्या कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे जर निधन झाले असेल तर विधवा झालेल्या महिलांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एक आधार म्हणून त्यांच्या घरी जावून सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी हे विविध शासकीय योजनांचे अर्ज हे भरून घेणार आहे. तसच या महिलांना तसेच पालक गमावलेल्या बालकांना विविध शासकीय योजनांचा लाभ हा घरबसल्या मिळवून देण्यात येणार आहे. एकंदरीतच शासन आपल्या दारी ही संकल्पना राबवून या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य ही योजना आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालविण्यात येणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button