घराच्या बागेत नारळ काढण्यासाठी गेलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काशीराम आगरे यांचा पडून मृत्यू


नारळ काढताना दुर्दैवीरित्या पडून मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यात नरवण येथे घडली आहे. आपल्या घराच्या बागेत नारळ काढण्यासाठी गेलेले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काशीराम आगरे यांचा दुर्दैवीरित्या पडून मृत्यू झाला आहे.

२४ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हे दुर्दैवी घटना आगरे यांच्या घराच्याच मागे असलेल्या बागेत घडली. घराच्या पाठीमागील मागील बाजूस असलेल्या नारळाच्या बागेमध्ये नारळ काढण्याकरिता घरी पत्नीला सांगून गेले होते. परंतु ते दुपारी एक वाजल्यानंतरही आले नाहीत म्हणून पत्नी बागेत इतका उशीर का झाला हे पाहण्यासाठी गेली. यावेळी तिला समोर दिसलेले दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली.काही वेळापूर्वी नारळ करण्यासाठी गेलेले चंद्रकांत आगरे नारळाच्या झाडाखाली जखमी अवस्थेत पडले होते. हा सगळा धक्कादायक प्रकार पाहून जीवाच्या आकांताने ओरडून पत्नीने हा प्रकार तात्काळ शेजारी व नातेवाईकांना कळविला. यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ जवळच्या नरवण प्राथमिक रुग्णालयात उपचारकरता दाखल केले.
नरवण प्राथमिक केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी आगरे यांना तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. गुहागर नरवण येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते कार्यरत होते. ते स्वतः रिक्षा चालकही होते मदतशील स्वभावाचे म्हणून ते सगळ्यांना परिचित होते. परिसरात त्यांना आप्पा या नावाने ओळखले जात होते. त्यांच्या या अपघाती निधनाने नरवण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक ,राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी मुले असे कुटुंब आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button